Tuesday 23 July 2013

मोदी आणि औरंगजेब


                                                                                                                                                                                        Courtesy TOI
शाहजहाँला तुरुंगात टाकल्यावरच औरंगजेबाला सत्ता मिळाली होती. नरेंद्र मोदी यांचा आदर्श औरंगजेबच असावा. पण लालकृष्ण अडवाणी म्हणजे शाहजहाँ नव्हेत. त्यांनी राजीनामा असा फेकला की 'नमोनिया' बुमरँग झालं.


अडवाणी एकटे पडतील. सगळा पक्ष, सगळा देश मोदींच्या पाठी उभा राहिल. ही अटकळ नितीन गडकरी, अरून जेटली, राजनाथ सिंह आणि अशोक सिंघल या चौकडीचीच नव्हती फक्त. मोहन भागवतांचाही तोच कयास होता.

महाभारतातल्या भस्मासुरातली उपमा कोणी नरेंद्र मोदींना दिली. पण नरेंद्र मोदींचा आर्श औरंगजेबच आहे. तीच महत्वाकांक्षा. तोच रस्ता. औरंगजेबाने आपल्या भावांना मारलं. बापाला नाही. नरेंद्र मोदीही औरंगजेबा इतकेच दयाळू आहेत. आपल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला जेरबंद केलं की दिल्लीचा दरवाजा आपोआप उघडेल, हा त्यांचा होरा मात्र चुकला. शाहजहाँसारखे अडवाणी दिल्लीचे पातशाह अजून झालेले नाहीत. शाहजहाँची इतर मुलं म्हणजे आपली भावंड औरंगजेबाने मारुन टाकली होती. बादशाह एकटा पडला होता. अडवाणी ना भाजपात एकटे होते ना एनडीएत एकटे आहेत.

मोदी आणि औरंगजेब यांची साम्य स्थळं सांगण्याची फार गरज नाही. दोघांमध्ये एक फरक जरुर आहे. औरंगजेब बादशाह झाला होता आणि मोदी झालेले नाहीत. हा तो फरक नाही. दिल्लीची नाही तर भाजपाची सत्ता मोदींना जरुर मिळू शकेल. रा.स्व. संघाने मोदींना त्यासाठी रस्ता तयार करुन ठेवण्याचं काम सुरु केलं आहे. मात्र भाजपाच्या सत्ताधिशाला देशाची सत्ता मिळतेच असं नाही. जहाल अडवाणींच्या ऐवजी उदार कवीमनाच्या वाजपेयींना देशानं स्विकारलं होतं.

मोदी आणि औरंगजेब यांच्यात फरक आहे, तो राज्यकर्ता म्हणून असलेल्या वृत्तीतला.

हिंदुस्थानचा बादशाह असलेला औरंगजेब आपला स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी सरकारी तिजोरीत कधी हात घालत नव्हता. त्याची कबरही त्याच्या मृत्यूनंतरही तितकीच साधी आणि मातीची राहिली आहे. त्या कबरीवर संगमरवराचा गड कधी चढलेला नाही. त्याचं व्यक्तिगत जीवन त्याने अतिशय साधेपणानं व्यतित वेत्र्लं. असं इतिहास सांगतो. टोप्या विणून तो स्वतःचा खर्च भागवत असे. नरेंद्र मोदी रोज नवं जाकेट घालतात. जाकेट शिवणारा त्यांचा खास टेलर आहे. पॅत्र्शन डिझायनर. आपल्या कपड्यांवर कोणी किती खर्च करायचा हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण मायावतींच्या पर्सची आणि जयललितांच्या सॅण्डलस्‌ची चर्चा करायला मिडियाला आवडत असेल तर मोदींच्या जाकेटची का नको. माझा आक्षेप त्यांच्या जाकेटवर किंवा त्यांच्या जीवन शैलीवर नाही. राजकीय व्रत्रैर्याची साम्यस्थळे सांगताना फरकही सांगितला पाहिजे.

म्हातारपणात सत्तेचा हव्यास सुटलेला नाही, अशी अडवाणींवर टिका करणारे अनेक आहेत. परंतु भाजपला 2 वरुन 182 जागांवर नेऊन ठेवणार्‍या त्या पक्षाच्या बापालाच असं एकटं पाडणं भाजपातल्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला आणि भाजपाशी सुतराम संबंध नसलेल्या करोडो भारतीयांना आवडलेलं नाही. तसं नसतं तर भाजपाचे तमाम नेते आणि सरसंघचालक मोहन भागवत अडवाणींच्या पाया जाऊन पडले नसते. मोहन भागवत सरसंघचालक जरुर असतील. पण संघ परिवाराच्या सर्वोच्च चारपाच नेत्यांमध्ये लालवृत्र्ष्ण अडवाणी यांचं स्थान सर्वोच्च आहे, याची कल्पना परिवाराच्या बाहेरच्या फारच थोड्या मंडळींना असेल. अडवाणी वेत्र्वळ संघ परिवाराच्याच सर्वोच्च स्थानी आहेत असं नाही. संघ परिवार देशातला एक प्रवाह जरुर आहे. तो मुख्य प्रवाह नाही. संघाच्या पलिकडचा देश खूप मोठा आहे. विहिरीतल्या बेडकाला बाहेरचं जग माहित नसतं. या बाहेरच्या जगात अडवाणींनी स्वतःचं एक स्थान निर्माण वेत्र्लं आहे. म्हणूनच अडवाणी एकटे पडले नाहीत.

प्रश्न केवळ अडवाणींचा नव्हता. मोदी साहसामुळे आज एनडीएमध्ये पुत्र्ट पडली आहे. अडवाणींना वजा करुन होणार्‍या राजकारणाने एनडीए एक राहू शकत नाही हे आता स्पष्ट झालं आहे. ज्या कारणासाठी अडवाणी टोकाचं पाउत्र्ल उचलतात, त्याच कारणावरुन  अन्य सेक्युलर घटकांनी मोदींच्या भाजपाला साथ का द्यावी?  मोदी भाजपाचा उद्या जरुर ताबा घेऊ शकतील. पण देशाचं स्टेअरींग मोदींच्या हाती कधी लागणार नाही. संघ म्हणजे देश नाही. भाजपा म्हणजे देश नाही. मोदी म्हणजे देश तर बिलकुल नाही. हा देश एका जातीचा, एका धर्माचा, एका भाषेचा, एका विचारांचा, एका संस्कृतीचा कधीच नव्हता. हिंदुत्वाच्या, वर्ण वर्चस्वाच्या एका पोषाखात हा देश, त्यांनी किती आटापिटा केला तरी संघ संचलन कधीच करणार नाही. तिथे मोदीचं फासीस्ट नेतृत्व स्विकारण्याचा प्रश्नच येत नाही.

मोदींच्या विकास नितीचं या देशातल्या लब्ध प्रतिष्ठीतांमधल्या एका वर्गाला जरुर आकर्षण आहे. मोदी कसे नॉन करप्ट आहेत आणि विकासाचा एक्सप्रेस हायवे फक्त गुजरात मधूनच धावतो अशा कथा रंगवणं कॉर्पोरेट जगताला आणि त्याची बटिक असलेल्या मिडीयाला सोयीचं आहे. पण मोदींचा विकासाचा रस्ता नैसर्गिक संसाधनांच्या विखारी ओरबाडण्यातून, भूमिपुत्रांच्या र्निय विस्थापनातून, शोषितांच्या शोषणातून आणि रक्तरंजित द्वेषातून बांधला गेला आहे.

परवा ते पुण्यात येऊन गेले आणि शिक्षण क्षेत्राचा स्वतःचा तथाकथित अजेंडा त्यांनी जाहीर वेत्र्ला. तेव्हापासून देशातील शैक्षणिक व्रत्रंती जणू गुजरातमध्ये झाली असं चित्र संघ परिवारातला मिडीया रंगवत आहे. पण वस्तुस्थिती अलग आहे. गुजरातचा नंबर महाराष्ट्राच्या खाली आहे. महाराष्ट्र 9व्या नंबरवर आहे. गुजरात 13 व्या नंबरवर आहे. बर्‍याचा कम्युनिस्ट, कधी काँग्रेसच्या ताब्यात राहणार्‍या वेत्र्रळने पहिला नंबर सोडलेला नाही. जीडीपीमध्ये महाराष्ट्र 1 नंबरवर आहे. गुजरात खूप मागे आहे. शेती क्षेत्रातलं किमान वेतन महाराष्ट्रात 120 रुपये आहे. बिहारमध्ये 109 ते 114 रुपये आहे. तर गुजरात मध्ये 100 रुपये आहे.

State or

union territory
Crore Rupees 2011-12 nominal GDP
Billions

USD FY11-12 Nov 2012 INR rates
Per capita GDP INR
India
8,353,495
$1,564.96
61,564
Maharashtra
1,248,452
$233.89
101,314
Andhra Pradesh
676,234
$126.61
71,540
Uttar Pradesh
6,76,083
$125.86
30,051
Tamil Nadu
639,024
$119.72
84,496
Gujarat
613,172
$116.14
89,668

गुजरातने सिंचनात आणि उद्योगात महाराष्ट्राच्या पाठोपाठ नक्कीच प्रगती केली आहे. मात्र ही प्रगती केवळ मोदींच्या काळातली नाही. त्यांच्या आधीच्या किमान पाच मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांनी या विकासाची पायाभरणी केली आहे. त्याचा उल्लेखही मोदी करत नाहीत. जणू त्यांच्या आधी गुजरातमध्ये अंधाराचं राज्य होतं.

नर्मदा सरोवर योजनेचं श्रेय मोदींचे खचित नाही. त्यांच्या काळात ती पूर्णत्वाला जाते आहे इतकंच. पण त्या नावावरही निर्लज्ज खोटेपणाची मोदी कमाल करतात. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमुळे महाराष्ट्राला 400 कोटी रुपये किमतीची मोफत वीज मिळू शकत नाही. असा आरोप त्यांनी नुकताच पुण्यातल्या सभेत वेत्र्ला. त्यांच्या आरोपाला नर्मदा बचाव आंदोलनानेच जे उत्तर दिलं आहे, ते लोकसत्तेत प्रसिद्ध झालं आहे. खाली ते दिलं आहे. मोदींचा खोटेपणा सिद्ध करण्यास ते पुरेसं ठरावं.

गुजरात तिसर्‍यादा जिंकल्यानंतर थेट पंतप्रधानकीचं स्वप्न आता मोदी पाहत आहेत. पी.एम. मोदी म्हणून त्यांचं मार्केटींग सुरु आहे. उत्तराखंडातल्या महाप्रलयातून 15 हजार माणसं वाचवल्याचा दावा त्यांनी केला. जे काम सैन्याला जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलं. मुंबईतलं त्यांचं भाषण आणि त्यांचा अ‍ॅटिट्युड ज्यांनी पाहिला असेल त्यांनी त्यातून झिरपणारा नथुरामी अहंकार जरुर पाहिला असेल. उदारतेची, राम राज्याची झुल त्यांनी किती पांघरु देत, त्यांच्यात दडलेलं हिंस्त्र श्वापद दडून राहत नाही.

सरकार प्रायोजित गुजरात दंगली नंतर मोदींना बदलण्याचा निर्णय त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी घेतला होता. मोदींना त्यांनी राजधर्माची आठवण करुन दिली होती. अडवाणी यांनी मात्र त्यावेळी मोदींची बाजू घेतली. त्यांना संरक्षण दिलं. त्याच अडवाणींना बाजूला ढकलत मोदी घोड्यावर स्वार झाले. गोव्यात त्यांनी अडवाणींचं नावं सुद्धा घेतलं नाही.

गोव्यात त्यांनी काय भाषण केलं? मोदी म्हणाले, ''गोवा मेरे लिए लकी है. इसी गोवा मे मुझे गुजरात चलाने का लायसन मिला.''

राज्य म्हणजे काय दुकान आहे? की कसला ठेका आहे? पवित्र मातृभूमीचे स्तोत्र गाणार्‍या संघ पुत्राच्या लेखी मातृ भू म्हणजे दुकान आणि ठेका असेल तर त्याला काय म्हणायचं?

सार्वभौम जनतेचं राज्य चालवणं हा ठेका मानणार्‍या वृत्तीच्या हातात देशच काय ते राज्यही कायम ठेवणं त्या राज्यासाठी, लोकशाहीसाठी धोकादायक आहे. अडवाणींना सुद्धा टोकाचं पाऊल उचलावं लागत असेल, नितिशकुमार, शरद यादवांना त्यांच्यासोबत राहू नये असं वाटत असेल तर देशाच्या जनतेने काय ठरवायचं?

आमदार कपिल पाटील
अध्यक्ष, लोकभारती
kapilhpatil@gmail.com

     _______________________________________________
मोदी पंतप्रधान होऊ नयेत : अमर्त्य सेन
Jul 22, 2013, 03.32PM IST  
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये जे आर्थिक विकासाचे मॉडेल राबवले ते मला अर्थशास्त्रज्ञ म्हणून अयोग्य वाटते. म्हणूनच मोदी पंतप्रधान होऊ नयेत, अशी माझ्या भारतीय मनाची इच्छा आहे, असे विधान नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी केले आहे.
सीएनएन-आईबीएन या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत डॉ. सेन यांनी हे विचार व्यक्त केले. या मुलाखतीत त्यांनी मोदींचा हा विकास सर्वसमावेशक नसल्याचा मुद्दा अधोरेखित केला. समाजातील मागास आणि अल्पसंख्य घटकाला मोदींच्या विकासामध्ये सुरक्षित वाटत नाही, असे ते म्हणतात.
विकासाला सामाजिक बदलांपासून वेगळे करता येत नाही. फक्त उच्च विकास दर हा गरीबी निर्मुलनाचा उपाय होऊ शकत नाही. त्यासाठी सर्वसमावेशक विकास महत्त्वाचा आहे. असे सांगत डॉ. सेन यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची स्तुती केली आहे.
नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या मॉडेलमधील कोणते मॉडेल देशासाठी योग्य यावर सध्या अर्थशास्त्रज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे डॉ. सेन यांनी मोदींच्या मॉडेलवर टीका करून नितीश कुमार यांची केलेली स्तुती फक्त अर्थशास्त्राच्या दृष्टीने नव्हे तर राजकीय दृष्टीनेही महत्त्वाचे मानली जात आहे.http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Amartya-Sen-dont-want-Narendra-Modi-as-PM/articleshow/21243530.cms 
     _______________________________________________



 

Friday 12 July 2013

शत्रू घरातला असेल तर?








जगात भारताची ओळख आहे ती, बुद्धाचा भारत म्हणून. भारताचा शोध घेण्याऱ्या पंडित नेहरुंनाही बुद्धाचाच भारत प्रिय होता. बोधगयेत घडवलेले साखळी बॉम्बस्फोट हा हल्ला केवळ बुद्ध विहारावर नव्हता. या प्राचीन देशाची जी खरी ओळख आहे. जी सभ्यता आणि संस्कृती आहे. तिच्यावरचा तो हल्ला आहे. 

बॉम्बस्फोट घडवणारे हात कुणाचेही असोत. खरे गुन्हेगार दुसरेच आहेत. ज्या शक्तींनी हे षड्यंत्र रचलं आहे, त्यांचा हेतू स्पष्ट आहे. कारस्थान मोठं आहे. 

शक्यता दोन आहेत. अतिरेकी पाकिस्तानी असू शकतात किंवा अतिरेकी देशांतर्गतही असू शकतात. पाकिस्तानी असतील तर लढाई सोपी आहे. फार तपशिलात जाण्याची गरज लागत नाही. आपल्या देशाच्या सुरक्षा यंत्रणा तेवढ्या सक्षम नक्कीच आहेत. बाह्य शक्तींनी कितीही हल्ले केले तरी देश कोसळण्याची किंवा त्यातून अस्थिरता माजण्याची कदापि शक्यता नाही. आपला देश मजबूत आहे. बाहेरच्या शत्रुला चीनची सरहद्द सोडली तर पराभवच पत्करावा लागला आहे. सरहद्दी वरचं आव्हान पेलायला आपलं सैन्य समर्थ आहे.

पण शत्रू घरातला असेल तर?

दिग्विजय सिंग यांच्याबद्दल भाजप परिवारामध्ये राग असणं स्वाभाविक आहे. त्यांची विधानं सर्वसामान्यांनाही कधी कधी टोकाची वाटतात. पण कॉंग्रेस पक्षात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच जे सेक्युलर नेते आहेत त्यापैकी दिग्विजय सिंग यांचा नंबर वरचा लागेल. मध्य प्रदेशात ते मुख्यमंत्री होते तेव्हा दलित अजेंडा राबवण्याची त्यांनी हिम्मत केली होती. खाजगी उद्योग क्षेत्रात वंचित, शोषितांना सामाजिक न्याय देण्यासाठी अमेरिकेप्रमाणे affirmative action घ्यावी अशी भूमिका त्यांनी मांडली त्याची राजकीय किंमतही त्यांना चुकवावी लागली. 

आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी कधीही न चुकवणारा हा भागवतधर्मी विठ्ठल भक्त राजकारणात तुकोबांचीच रोकठोक भाषा बोलतो. माझी त्यांची भेट आषाढी एकादशीला एकदा झाली होती. फोनवर दोनदा बोलणंही झालं आहे. पण बाकी संपर्क नाही. परवा ते काय म्हणाले?

''अमित शहा अयोध्येला भेट देतात. नरेंद्र मोदी बिहारच्या मुख्यमंत्र्यांना धमकी देतात आणि दुसऱ्या दिवशी बॉम्बस्फोट होतो. या घटनांचा काय संबंध, मला माहित नाही.''

दिग्विजय सिंग यांच्या या वक्तव्यावर भाजप परिवारातून संतापाचे फुत्कार बाहेर न पडते तरच नवल. 'अतिरेकी हिंदू असू शकत नाही. सगळेच अतिरेकी मुसलमान कसे?' असे एसएमएस देशभर फिरवणारे असे रागावणे समजू शकतो. पण दिग्विजय सिंग यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचं उत्तर ते देऊ शकत नाहीत. कारण शत्रू घरातलाच असण्याची शक्यता अधिक आहे. 

नांदेड, परभणी आणि मालेगावचे बॉम्बस्फोट कुणी घडवले हे सांगायला आता नागपूरच्या आरशाची गरज नाही. समझोता एक्प्रेसमध्ये ६९ लोकांचे जीव कोणी घेतले हे जगापुढे कधीचं आलं आहे. शहीद हेमंत करकरे यांनी देशांतर्गत लपलेला शत्रू शोधून काढला नसता तर अतिरेक्यांची ही दुसरी बाजू कधीच समोर आली नसती. देशाबाहेरच्या शत्रूंनी मुंबईवर जो सर्वात मोठा हल्ला केला तो केवळ हल्ला नव्हता ते युद्ध होतं. त्या रणांगणात बाकीचे अधिकारी पळून जात असताना. कामटे, साळसकर, ओंबाळे यांच्या समवेत हेमंत करकरे नावाचा त्यांचा सेनापती शहीद झाला. पण त्याच सकाळी हेमंत करकरे यांच्या कुटुंबावर अत्यंत निलाजरी, जीवघेणी टीकेची झोड उठवण्यात आली होती. घाणेरडे फोन आणि एसएमएस यांनी त्यांच्या कुटुंबाला छळून सोडलं होतं. 

हेमंत करकरे यांनी नथुरामी परंपरेचा तो चेहरा बेनकाब केला. वर्दी सेक्युलर असते. देशभक्त असते. तिला धर्म नसतो हे दाखवून दिलं. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आणि त्या संविधानाने निर्माण केलेल्या न्याय संस्थेने नथुराम आणि कसाब यांच्यात फरक केलेला नाही. मुंबई अन महाराष्ट्राला अभिमानाची गोष्ट ही की, या देशाचे संविधानकर्ते अन भाग्यविधाते डॉ. आंबेडकर या भूमिचेच पुत्र. आपल्या प्राणाचे मोल देत आपल्या तुकाराम ओंबळे यांनी कासाबला याच भूमीत गाडण्यासाठी जिवंत पकडलं. नथुराम हा एकच कलंक असेल पण पुण्याच्याच आपल्या काकासाहेब गाडगीळांनी त्याला ओळखलं म्हणून तो फासावर चढू शकला. देशांतर्गत आणि देशाबाहेरच्या अशा दोन्ही शत्रुंशी लढत शहीद होणारे हेमंत करकरे या महाराष्ट्राचेच. मला खात्री आहे बिहारमधल्या बॉम्बस्फोटाची पाळमुळं महाराष्ट्राचीच एटीएस खणून काढील. 

दहशतवादी इथले असोत की तिथले. त्यांच्या प्रेरणा समान आहेत. या देशाच्या सांस्कृतिक बहुविधतेला भेद आणि द्वेषात परिवर्तित करण्याचा तो डाव आहे. बिहार आणि महाराष्ट्रातल्या ताज्या राजकारणाचा संदर्भ त्याला आहेच. दिल्ली आक्रमणाच्या तयारीचा तो भाग आहे. जगभरचे सांस्कृतिक संघर्ष तीव्रतर करण्यामागे आणि दहशतवाद्यांच्या निर्मिती आणि पोषणामध्ये जगातल्या तेल साठ्यांवर कब्जा मिळवणाऱ्या जागतिक भांडवलदारांचा सहभाग लपून राहिलेला नाही. दहशतवादी कृत्यांमागच्या या प्रेरणा सामान्य माणसालाही आता कळू लागल्या आहेत. म्हणून या शक्तींचे डाव तो आपल्या भूमीवर खेळू देत नाहीत. 

बोधगयेवरच्या हल्ल्याचा निषेध बौद्ध जनतेने अत्यंत संयमाने केला. तथागत गौतम बुद्धांच्या शांती मार्गाने केला. त्या संयमाला सलाम केला पाहिजे. 

माणसाच्या दुःखाचा, वेदनेचा शोध सर्वप्रथम बुद्धानेच घेतला. माणसाला दुखः आहे. दुःखाला कारण आहे. त्यावर उपाय आहे आणि दुखः दूर करता येतं. अशी चार आर्य सत्ये तथागतांनी जगाला दिली. दहशतवादी आणि अतिरेक्यांना धर्म नसतो. असतो तो फक्त द्वेषाचा धर्म. या द्वेषाला माणसाच्या मनातून हद्दपार करणारं तत्वज्ञान बुद्धाने जगाला दिलं. बोधगयेवरच्या संयमी प्रतिक्रिया अतिरेक्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होऊ देणार नाहीत. 

आमदार कपिल पाटील 
अध्यक्ष, लोक भारती 
kapilhpatil@gmail.com

Saturday 6 July 2013

इशरतला न्याय मिळेल?



ख्वाजा युनुसला न्याय नाही मिळाला. पण इशरतला मिळण्याची शक्यता आहे. फेक एन्काउंटरने निष्पाप इशरतचा जीव घेणाऱ्या बेगुमान राज्यकर्त्यांना सजा होण्याची शक्यता नाही. पण ती अतिरेकी कधीच नव्हती. यावर शिक्कामोर्तब झालं. तेही काही कमी नाही. किमान तिच्या आईला आपली मुलगी निष्पाप होती हे सिद्ध झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

ख्वाजा युनुसच्या मृतदेहाची राखही शिल्लक न ठेवण्याची दक्षता पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली होती. ते अधिकारी मराठी आहेत म्हणून देशभक्त असल्याचा दिंडोरा पेटवण्यात काहीना यश आलं. नथुरामलाही देशभक्त ठरवणाऱ्यांची पिलावळ महाराष्ट्रात अजून शिल्लक आहे. त्यांचं देशभक्तीच गणित एकदम सोपं आहे. जे हिंदू म्हणून जन्माला येतात, ते देशभक्तच असतात. दुसऱ्या धर्मात जन्म झाला की, तो जन्मताच देशद्रोही ठरतो. स्वातंत्र्यवीर सावरकर 'स्वातंत्र्यवीर देशभक्त' खरे पण त्यांनीही देशभक्तीची व्याख्या धर्मसंस्कृतीपुरतीच मर्यादित ठेवली आहे. या देशाला संविधान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरालाही त्यांनी देशांतर ठरवलं होतं. इशरत प्रकरणात सीबीआयने एन्काउंटर फेक असल्याचे दाखवून देताच अतिरेकी मुसलमानच असतात अशी प्रतिक्रिया देणारेही होते.


अतिरेक्यांना ते मानत असलेला धर्म असतोच असतो. परद्वेषाचा आधार जेव्हा धर्म असतो, तेव्हा धर्मासाठी अतिरेकी पाऊल उचललं जातं हे वास्तव नाकारण्याची गरज नाही. मुस्लिम अतिरेक्यांच्या बातम्या आपण जास्त वाचतो म्हणजे अतिरेकी मुस्लिम असतात हा निष्कर्ष काढणं म्हणजे स्वत:ची फसवणूक करून घेण्यासारखं आहे. आपण ठरवून निवडक बातम्या वाचत असतो. कारण आपल्या डोक्यात ते गणित पक्क असतं. दुसऱ्या अतिरेक्यांच्या बातम्याही डोळ्यासमोरून जात असतात. पण आपली नेणिव ती वाचायला तयार नसते.


या देशातल्या दहशतवादाची, अतिरेकी चळवळीची सुरवात केली ती नथुरामाने. त्याला वैचारिक प्रेरणा आणि समर्थन दिलं ते मुस्लिम द्वेषी, वर्ण वर्चस्ववादी जहाल हिंदुत्ववादाने. भारतात दोन राष्ट्र आहेत. हिंदू आणि मुसलमान, ही संकल्पनाही पहिल्यांदा मांडली ती या कट्टरपंथी हिंदुत्ववाद्यांनीच. ही दोन राष्ट्र एकत्र नांदू शकत नाहीत, या त्यांच्या प्रचाराला सर्वप्रथम विरोध केला तो उदार हिंदू नेत्यांनी आणि दोन राष्ट्रांच्या भूमिकेला समर्थन दिलं ते जीनांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगने.


द्वी राष्ट्रवादाचे जनक कट्टर हिंदुत्ववादीच होते आणि समर्थक कट्टर मुस्लिम लीगवाले होते. मुस्लिम रेनॉसान्सचे जनक सर सय्यद अहमद यांच्यावर हिंदू, मुस्लिम दोन राष्ट्र असल्याचा पुरस्कार केल्याचा आरोप केला जातो. पण तो निखालस खोटा आहे. सर सय्यद अहमद यांनी नेशन किवा राष्ट्र असा शब्ध्प्रयोग कधीही केलेला नाही. हिंदू, मुस्लिम या दोन कौम आहेत असा तो शब्दप्रयोग आहे. या दोन कौम हिंदुस्तानचे दोन डोळे आहेत, असं ते म्हणत. दोघांच्या अश्रूंचा आणि लहुचा रंग एक आहे. वेगळा नाही. ही त्यांची भूमिका होती.


राजकीय हिंदुत्वाचे जनक म्हणून ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे पाहिलं जातं तेही अंदमानात जाईपर्यंत सेक्युलर स्वातंत्र्य सेनानी होते. अंदमानातून ते बाहेर पडले आणि हिंदुत्ववादी नेते झाले. ब्रिटीशांनी त्यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेवरून माफी देत, बाहेर काढताना जी रणनीती आखली होती त्याचा तो भाग होता. विनायक दामोदर सावरकर यांनी माफीनामा देउन अंदमानच्या महाभयंकर शिक्षेतून सुटका करून घेतली. म्हणून देशभक्ती कमी होत नाही. किवा त्यांच्या स्वातंत्र्यवीर किताबाला उणेपणा देण्याचं कारण नाही. त्यांच्या घनघोर त्यागाला आणि संघर्षाला सलामच केला पाहिजे. पण अंदमानच्या आधी अत्यंत विज्ञाननिष्ट, इहवादी आणि सेक्युलर असलेले स्वातंत्र्यवीर अंदमानच्या सुटकेनंतर हिंदुत्ववादी नेते बनतात हा ब्रिटीशांच्या फोडा आणि राज्य करा या रणनीतीचा भाग होता.


खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मनातही ती खंत कायम असावी. अन्यथा रत्नागिरीच्या मुक्कामात महात्मा गांधींना त्यांनी आपल्या घरी बोलावून चहा दिला नसता. १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला तेव्हा सावरकरांनी आपल्या दादरच्या घरावर भगवा नाही तिरंगा फडकवला होता. खूप खूप आधी त्यांनी तयार केलेल्या राष्ट्रध्वजावर चांद ताराही त्यांना प्यारा होता, असं शेषराव मोरेनीच दाखवून दिलं आहे.


भारतातल्या दहशतवादी थैमानाने हिंदूंचे जितके प्राण घेतले त्याच्या कैक पटीने एकट्या काश्मिरमधल्या मुस्लिमांचे प्राण घेतले. दहशवादी कुणा एका धर्माचा असतो, म्हणून त्या त्या धर्माचे सगळे दहशतवादी हा विपर्यास झाला. श्रीलंकेतील तामिळ अतिरेकी कट्टर हिंदू आहेत. ईशान्येकडील राज्यांमधील सशस्त्र मार्गाने लढणारे शेकडो हजारो देशबांधव आणि मध्य भारतात आदिवासींच्या शोषणाविरोधात उभे ठाकलेले नक्षलवादी मुसलमान नाहीत. त्या दोघांचाही मार्ग दहशतवादी आहे. देशाला आणि लोकशाहीला तितकाच घातक आहे. आसाममधील उल्फा बंडखोर उच्चभ्रू वरिष्ठ जातीतील हिंदू आहेत. Bodo Land साठी लढणारे हिंदूच आहेत. त्यांच्या बातम्या रोज असतात. त्यांच्या हिंसाचारात रोज शेकडो माणसं मरतात, पण आपण त्यांना दहशतवादी म्हणत नाही. कारण ते मुसलमान नसतात म्हणूनच ना?


उल्फा दहशतवादी वरिष्ठ जातीचे हिंदू आहेत. म्हणून या देशातल्या सगळ्या वरिष्ठ हिंदू जाती दहशतवादी आहेत, असं म्हणणं मूर्खपणाचं ठरेल. नथूरामने महात्माजींची हत्या केल्यानंतर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ब्राम्हणांची घरं जाळण्यात आली. त्यांना पळवून लावण्यात आलं, हा मूर्खपणा होता. नथुरामवादाच्या  विरोधात भूमिका घेत असंख्य ब्राम्हण स्वातंत्र्याच्या आणि समतेच्या चळवळीत उतरले होते. त्यांना नथुराम ठरवणे हा घोर अन्यायच ठरतो. प्रज्ञा भारती आणि कर्नल पुरोहित नथुराम परिवाराचे पाईक आहेत. त्यांच्यावर फुलं उधळणाऱ्याना देशभक्त म्हणता येणार नाही. पण त्यांचे कोणी नातेवाईक आणि जातवाले आहेत त्यांना देशद्रोही ठरवणं तितकंच मूर्खपणाच आणि अन्यायकारक आहे.


या देशातल्या स्वातंत्र्य लढ्यात लक्षावधी मुस्लिमांनी त्याग आणि बलिदान दिलं आहे. अंदमानच्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगली आहे. फासावर गेलेला अश्फाक उल्ला खान एकटा नव्हता. ब्रिटीशांनी फासावर चढवलेले आणि तोफेच्या तोंडी दिलेले मुसलमान किती याची बेरीज केली तर मुसलमानांना दहशतवादी ठरवताना स्वतःची लाज वाटते. मुंबईच्या आझाद मैदानात दोन तोफांच्या तोंडी मुसलमान सय्यद हुसैन आणि हिंदू मंगल गडिया या दोघांना एकाचवेळी बांधण्यात आलं होतं. हजारो मुंबईकरांनी त्यांच्या चिंधड्या उडताना पहिल्या. प्रेताचा कोणता तुकडा हिंदूचा आणि कोणता मुसलमानाचा असा प्रश्न अंत्यसंस्कार करणाऱ्यांना पडला होता.


दोघांच्या देशभक्तीचं रक्त मांस तर एकच होतं.



- कपिल पाटील

  अध्यक्ष, लोक भारती.
  kapilhpatil@gmail.com