Monday 1 September 2014

सक्तीची काय गरज आहे ?


सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी

सप्रेम नमस्कार,
येत्या दि. 5 सप्टेंबर 2014 रोजी, शिक्षक दिनी देशाला उद्देशून आपण भाषण करणार आहात. शिक्षक दिनी पंतप्रधानांनी असं भाषण करणं, हे पहिल्यांदाच घडत आहे. हा सुखद धक्का आहे. शिक्षकांसाठी सन्मान आहे. म्हणून त्याबद्दल आपलं मनःपूर्वक अभिनंदन आणि या निर्णयाचं स्वागत!

सगळा देश आपला संदेश एेकण्यासाठी उत्सुक आहे. पण हे भाषण विद्यार्थ्यांना एेकवण्याची सक्ती करणारा फतवा केंद्र सरकारने काढला आहे, हे वाचून मन खट्टू झालं. सक्तीची काय गरज आहे ? आणि वेळही दुपारी 3 ते 4.45 ची. अडचणीची.

आदेशात टिव्ही संचही उसनवारीने आणण्याचे फर्मान आहे. प्रत्येक वर्गात इतके टिव्ही संच आणायचे कुठून ? उसनवारीने पैसे तर द्यावेच लागतील. महाराष्ट्रात वेतनेतर अनुदान दहा वर्षात मिळालं नाही. मोठा बॅकलाॅग आहे. मोडकळलेल्या शाळांच्या दुरुस्तीसाठीही पैसे नाहीत. महागडं वीज बील भरतानाही नाकीनऊ येताहेत. इंटरनेटची व्यवस्था करायला सांगितली आहे. देशातल्या अर्ध्या अधिक खेड्यांमध्ये वीज असते कुठे ? तर इंटरनेट कुठू येणार ? आपल्या गुजरातमध्ये छोटे उदेपूर जिल्ह्यातल्या सजनपूर गावाच्या मुलांचा फोटो अलिकडेच प्रसिद्ध झाला होता. नदीच्या पल्याड आदिवासी पाड्यातल्या 125 मुला-मुलींना शाळेसाठी नदी पोहून जावं लागतं. त्यांच्यासाठी नदीवर साकव किंवा पुलही अजून झालेला नाही. ना होडीची सोय आहे. त्या मुलांना तुमचं भाषण एेकण्यासाठी टिव्ही केबलची जोडणी बहुदा नक्की होईल. निवडणुकीसाठी मतदान यंत्रे गाढवांवरून घेऊन जावी लागतात अनेक खेड्यात. 6 सप्टेंबरला टिव्ही संचही बहुदा असे गाढवांवरून वाहून नेताना फोटो प्रसिद्ध होतील.

 

5 सप्टेंबरला देशात मोठीच इव्हेंट असणार आहे. उत्सुकताही मोठी आहे.
पण 4 प्रश्न आहेत प्रधानमंत्रीजी,
1) आपले अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत नव्या सरकारचं बजेट मांडलं. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी भाषणात स्पष्ट सांगून टाकलं की, शिक्षणावर आता आणखी खचर् करण्याची गरज नाही. एक रुपयासुद्धा त्यांना वाढवून दिलेला नाही. शिक्षणावरचा खर्चच वाढवायचा नाही. तर शिक्षण सर्वत्र पोचणार कसं ? वाढणार कस ? तुम्ही असं का करतांय ? हे 5 सप्टेंबरला समजून घ्यायला आवडेल.

2) याचा अर्थ शिक्षणाचं खाजगीकरण आणखी वाढत जाणार हे उघड आहे. शिक्षणाच्या खाजगीकरणातून आणि व्यापारीकरणातून महागलेल्या शिक्षणाच्या संधी सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नाहीत. मध्यमवर्गीयां उच्च शिक्षण परवडत नाही. डाॅक्टर, इंजिनिअर व्हायला 10 ते 40 लाख रुपये लागतात. आणणार कुठून ? गरीबांच्या मुलांना स्वप्नही पाहता येत नाही. शिक्षक दिनी आपल्या भाषणातून आपण याबद्दल काही सांगणार का ? एेकायला देश उत्सुक आहे.

3) शिक्षकांच्या कंत्राटीकरणातून शिक्षण क्षेत्रात शिक्षकांचं शोषण सुरू आहे. महाराष्ट्रात शिक्षण सेवक (आता टिचर आॅन प्रोबेशन) म्हणत होते. तिथे गुजरात मध्ये विद्या सहायक म्हणतात. गुजरातमध्ये त्यांचा पगार आहे, फक्त रुपये 2500/-. हायकोर्टाच्या भाषेत याला वेठबिगारी म्हणतात. या सरकारी शोषणाला एनडीएच्याच काळात सुरुवात झाली. पहिला प्रयोग गुजरातमध्येच झाला. या शोषणाच्या समाप्तीची घोषणा आपल्या भाषणातून होईल का ? एेकायला देशातील शिक्षक उत्सुक आहेत.

4) गुजरातमध्ये दिनानाथ बात्रांचा नवा प्रयोग सुरू झाला आहे. या  ̒महान  ̓ शिक्षण तज्ज्ञाला शिक्षणातल्या समाज मूल्यांमुळे समाजाचा ऱहास होतोय असं वाटतंय. त्यांनी थेट अठराव्या शतकातल्या समाज मूल्यांचा पुरस्कार करणारी पुस्तकं तयार केली आहेत. शिकागोच्या धर्म परिषदेत सर्वांना  ̒माझ्या बंधु, भगिनींनो ̕ , अशी आपुलकीच्या नात्याची हाक घालणाऱया स्वामी विवेकानंद यांच्या नावावर भलत्याच कथा त्यांनी तयार केल्या आहेत. डाॅ.राधाकृष्णन यांच्याही कधीही कुणीही न वाचलेल्या (ना त्यांनी सांगितलेल्या) संस्कार कथा त्यात आहेत. जात, धर्म, रंग, भाषा भेदाचं विषारी जहर शाळेतच संस्कारीत करणाऱया या बात्रा प्रयोगाबद्दल देशाच्या मा. प्रधानमंत्र्यांचं काय म्हणणं आहे..... एेकायला देश उत्सुक आहे.

माननीय प्रधानमंत्रीजी, विक्रमादित्याला वेताळाने विचारलेले हे प्रश्न नाहीत. खेड्या-पाड्यात अडचणींच्या डोंगर-दऱया पार करत उद्याच्या पिढ्या घडवणारे आपले शिक्षक खूपच साधे आहेत. तुमच्या भाषणांचं फर्मान पोचलंय त्यांच्याकडे. तुमचं भाषण आपल्या मुलांना एेकवण्याच्या तयारीला लागले आहेत. प्रश्न विचारायला त्यांना वेळ आहेच कुठे ? जनगणनेपासून गुरंढोरं मोजण्यापर्यंत सगळीच कामं करावी लागतात त्यांना. त्यात आता टिव्ही, केबल किंवा डिश एन्टेना आणण्याचं काम. दोन दिवस त्यात जाणार आहेत. काही हरकत नाही. पण शिक्षक दिनी आपली आठवण होते आहे. यावर ते खूश आहेत. या न विचारलेल्या चार प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळाली तर ते भलतेच खूश होतील, प्रधानमंत्रीजी.

कळावे. लोभ असावा. धन्यवाद!

आपला स्नेहांकित 
आमदार कपिल पाटील 
अध्यक्ष, लोक भारती 

kapilhpatil@gmail.com

8 comments:

  1. आमदार पाटिल साहब,
    आपके ब्लॉग पर शिक्षा के बारे में पढ़ कर अच्छा लगा. आपके ब्लॉग पर विश्वविद्यालय के उन शिक्षकों के बारे में भी पढ़ने की इच्छा थी जो महीने के डेढ़ लाख रूपये लेते है और दिन में दो घंटे भी काम नहीं करते. उन शिक्षण महर्षियों के बारे में भी लिखा जाता तों बेहतर होता जो शिक्षक नियुक्ति के पैसे लेते है और जिन्होंने शिक्षा का बाजार सजा कर रखा है, ये सारे सरकारी स्कूल है. देश में यदि निजी स्कूल्स नहीं होते तों आज देश की हालात क्या होती, आप बता सकते है?
    दीनानाथ बत्रा पर आपत्ति के साथ ही कृपया देश के शिक्षा जगत पर दशकों से हावी वामपंथी असर का भी जिक्र किया होता तों मेहरबानी होती, जिन्होंने कभी हमारे बच्चों को भारत का इतिहास ही पहुंचने नहीं दिया, जिनके लिए आज भी हिन्दुस्थान का इतिहास १५ अगस्ट ४७ के बाद ही शुरू होता है. जो खुद जनता के पैसे पर मौज उड़ाते रहें पर लोगों को गरीब-अमीर के नाम पर लड़वाते रहें. जिन्होंने पहले रशिया का खून पिया, फिर चीन, कम्बोडिया और अब उत्तरी कोरिया का पी रहें है, किंतु आज भी भारत में जो बड़ी शान से घूमते है. इन मक्कारों के बारे में कुछ तों लिखा होता तों आपका लेख संतुलित हो जाता, बाकी आप खुद समझदार है
    अड् दिनेश शर्मा

    ReplyDelete
  2. Great. Let's hope Modi will read this.

    ReplyDelete
  3. कपिल जी आपण उपस्थित केलेले प्रश्न अगदी रास्त आहेत पण मी या घटनेकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहतो आहे . पंतप्रधान मोदी भाषण करणार म्हणून सगळ्या शाळा आणि शिक्षक कामाला लागलेत पण यामुळे हे उघड झालेत की अजूनही आपण देशातील शाळांमध्ये भौतिक सुविधा नीट पोहवू शकलो नाहीत हे या माध्यमातून अधोरेखित झाले . त्यामुळे असे फतवे निघू द्याच आणि कळू द्या की आपण शिक्षणात किती फटाके आहोत ते

    ReplyDelete
  4. Kapil Patil Sir
    Congratulayion,For this Letter.
    Shikshan Ka Bajarikaran Band Karo.Capitation Donation Band Karo.Give Practical Education To all.And Free Education To All Backword And EBc.

    ReplyDelete
  5. Ped lagane k liye GR nikalata hai yoga karne k liye GR nikalata hai Bharti Jo ki 2/5/12 se band kar k rakhi hai us k bare me koi dead line nahi nikalti SARAL ka kaam nikala us ki bhi Dead line bar bar de rahe hai lekin naya shikshak recruit karne k bare me koi dead line nahi de rahe shikshan divas par aap bacho se baat kar k khush huve par shiksh ko k saath koi baat chit nahi ye to student day huva teacher day kaha reh gaya pata nahi

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete