Thursday 30 May 2013

दुष्काळ निर्मूलन परिषद.

लोक भारती
दुष्काळ निर्मूलन परिषद. 
तज्ज्ञ आणि अभ्यासक कार्यकर्ते, पत्रकार व साहित्यिक यांची संयुक्त परिषद.

शनिवार दि. १ जून २०१३, दुपारी ३.३० वा. 
स्थळ : साने गुरुजी स्मारक, पर्वती पायथा, सिंहगड रस्ता, पुणे. 




रेसकोर्सवर घरे बांधा!


Thursday 2 May 2013

सरंजामी सिंहासनाखालचा सुरुंग

असभ्यअर्वाच्य आणि असंस्कृत शिवराळ भाषेची परंपरा महाराष्ट्राला नवी नाही
तो मक्ता  दुसऱ्यांचा होता शिवसेना मनसे नेत्यांची ही शैली अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे... 
मात्र सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणाचीयशवंतराव चव्हाण ते शरद पवार अशी परंपरा 
असलेल्या अजित पवारांकडून ती अपेक्षा नव्हती. 





















लब्ज एक ऐसी चीज है 
जो इन्सान को 
या तो दिल में उतारती है 
या दिल से उतारती है। 

इंदापूरच्या निंबोडी गावातराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या त्या वक्तव्याने 
असेच काहीसे घडलेत्यांचे ते शब्द असभ्य आणि असंस्कृत होतेयात दुमत नाहीपण ज्या 
परिस्थितीत आणि जे उदाहरण देत त्यांनीते उद्गार काढलेत्यातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 
डागण्या तर दिल्याचपण साऱ्या महाराष्ट्राला शरम वाटावी असंही काही घडलं

असभ्यअर्वाच्य आणि असंस्कृत शिवराळ भाषेची परंपरा महाराष्ट्राला नवी नाहीतो मक्ता 
दुसऱ्यांचा होताशिवसेना मनसे नेत्यांची ही शैली अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत्याला 
प्रतिष्ठा आहे असं नाहीमात्र सभ्य आणि सुसंस्कृत राजकारणाची यशवंतराव चव्हाण ते 
शरद पवार अशी परंपरा असलेल्या अजित पवारांकडून ती अपेक्षा नव्हतीनिंबोडीच्या त्यांच्या 
त्या भाषणातच त्यांनी दोन गोष्टी कबूल केल्या आहेतएकधरणात पाणीउरलेलं नाही
दोन लोकांना देण्यासाठी वीज उपलब्ध नाहीराज्यातला दुष्काळ एवढा तीव्र आहे असं स्वतःच 
कबूल करत अंधारात काय XXXX होतं आणि प्यायला काय XX देणार अशी भाषा ते करतात
तेव्हा प्रश्न निर्माण होणारचराज्यकर्तेच अशी भाषा वापरताततेव्हा असंतोषाचा स्फोट 
स्वाभाविक होतो


ज्या राजा विरोधा'तल्या असंतोषातून फ्रेंच राज्यक्रांती जन्माला आली त्या सोळाव्या लुईसच्या 
पत्नीचे उद्गार तुलनेने खूपच सभ्य म्हणायचेदुष्काळाने होरपळेल्या शेतकऱ्यांना पोटाची खळगी 
भरण्यासाठी पावही मिळत नव्हतातो मिळवण्यासाठी दंगली सुरू झाल्यातर राणी मारी-
आन्त्वाने (Marie-Antoinette) म्हणाली, 'पावमिळत नसतीलतर त्यांना केक खायला  
सांगा'. फ्रान्सची राणी असं वाक्य खरोखरंच वदली की नाहीयाबद्दल वाद आहेपण  
जगभरच्या इतिहासात मात्र त्याची नोंद झालीइतिहासात आपली अशी नोंद होणं अजित 
पवारांना खचितच आवडणार नाहीत्यांना उपरती झालीत्यांनी तीनदा जाहीर माफी  
मागितली. कराडच्या प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीला साक्ष ठेवून 
 प्रायश्चित्तही घेतलं


अजित पवारांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियाही तशाच 
आहेततितक्याच असमर्थनीयअसभ्यअर्वाच्यअसंस्कृतआणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेची भीडभाड
न बाळगणाऱ्याअजितपवारांच्या प्रतिमेवर शिवसैनिकांनी शिवांबू ओतलंतर दादरला मनसे 
सैनिकांनी लहान मुलाला पवारांच्या फोटोवर सू सू करायला लावलीपोरगं तयार नव्हतंतर 
त्याला टपल्या मारून करायला भाग पाडलंनंतर नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केलीपण नेत्यांची 
भाषा सैनिकांनी रस्त्यावर अमलात आणलीतर दोष त्या सामान्य अजाण सैनिकांना कसा देता 
येईलकालवरीच्या टेकडीवर त्या बाईने पाप केलं म्हणून साऱ्यांनीच हातात दगड उचलले
तेव्हा येशू ख्रिस्त म्हणाले'ज्यांच्या मनातही कधी पाप आलं नाहीत्यांनी जरूर दगड मारावा.' 
इथे कुणी कुणावर दगड मारावाबेशर्मी नावाचं एक रोपटं असतंते कुठेही उगवतं
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दोन्ही बांधांवरही ते तरारुन उगवलंय


इलेक्ट्रॉनिक मीडिया आपल्या टीआरपीसाठी हल्ली अशी भाषणं रोज लाइव्ह दाखवत असतो
मात्र सगळयांनाच हे भाग्य मिळत नाहीपण माध्यमांकडून अशा वक्तव्यांची दखल मात्र 
पक्षपातीपणे घेतली जात असल्याचा आक्षेप सत्ताधाऱ्यांकडून घेतला गेला आहेत्यात भाग्य 
दुर्भाग्याचा भाग नाहीअजित पवारांविरोधात उफाळेल्या रोषाला भांडारकर संस्था आणि 
दादोजी कोंडदेव यांच्यावरच्या हल्ल्याचाही संदर्भ आहेत्याची दखल पवारांनी किती घेतली 
माहीत नाहीपण महाराष्ट्राच्या सामाजिकराजकीय भूगर्भात पेटलेला जाती संघर्षाचा लाव्हा 
यानिमित्ताने वर आला नसतातरच नवल

जातधर्म आणि भाषा यांच्या द्वेषाची चूड लावत महाराष्ट्रात अनेकदा राजकारण झालं आहे
राज्यातल्या खऱ्या प्रश्नांवरच्या लढाया चिरडून टाकायच्या आणि द्वेषाची आग भडकवायची
हे दोन्ही बाजूने झालं आहेदोघांनाही तेसोयीचं असतंगिरणी कामगारांचा असंतोष दडपून 
टाकण्यासाठी बाबरी मशिदीचं निमित्त करतहिंदू मुस्लिम दंगल घडवण्यात आलीसेना 
भाजप युतीला १९९५मध्ये याच खेळातून सत्ता मिळालीअर्थात ती फार काळ टिकली नाही
पण तो खेळ काय फक्त त्यांनीच केला होतात्या सत्तांतरापूर्वीच्या पाच वर्षांत काँग्रेस अंतर्गत 
राजकारणात तोच खेळ सुरू होतातो चेंडू अलगद पकडत युती सत्तेवर आलीइतकंचसामान्य 
जनता त्यात होरपळून निघालीराजकारणाच्या कैफात जनतेचं होरपळणं कुणाच्या लेखी आहे
गेल्या पाच सात वर्षांच्या राजकारणात राष्ट्रवादीने तोच खेळ पुन्हा सुरू केला आहे मागच्या 
खेळात आपली सत्ता गेली होतीयाचं भान त्यांना आलेलं नाहीयाच कैफात युतीलाही साडेचार 
वर्षांत गाशा गुंडाळावा लागला होतामहाराष्ट्रातील सलग१३ १४ वर्षांच्या सत्तेचा मद इतका 
आहेबेफिकिरी इतकी आहे की आपल्याच गंजीला आपणच आग लावतो आहोतयाचं भानही 
विद्यमान राज्यकर्त्यांना नाही

सत्तासंपत्तीप्रसिद्धीगर्दी आणि लोकप्रियता यांचा एक माज असतोतो निरंकुश बनतो
मग ज्या सामान्य माणसांच्या मतांवर लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला ही सत्ता 
मिळाली आहेत्या लोकशाहीची आणि लोकांची पर्वा राहत नाहीपुरोगामी म्हणवला जाणारा 
महाराष्ट्र अजून सरंजामशाहीतून बाहेर आलेला नाहीसत्ताधारीच नाहीतर विरोधी 
पक्षातल्या नेत्यांचं वागणंही सरंजामदारांपेक्षा कमी नाहीकुठे धरणांशिवाय भ्रष्टाचाराचे पाट 
वाहतातकुठे खंडण्यासेटलमेंट आणि भ्रष्टाचाराचे टोलनाके सुरू होतातपरस्परांवर 
अधुनमधून चिखलफेक करणं हा परस्परांच्या सोयीच्या राजकारणाचा भाग बनलाय 


पण कधीतरी नेम चुकतो आणि थेट सामान्य माणसाच्या अंगावर चिखल उडतोमोहोळ 
तालुक्यात पाणी यावं म्हणून प्रभाकर देशमुख आझाद मैदानातदोन महिने धरणं धरून बसले 
होतेउजनी धरणातलं पाणी दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न देता 
बारामतीतील डायनॉमिक्स दूध डेअरीला बेकायदेशीररीत्या दिलं जात आहेअसा त्यांचा आक्षेप 
होतापाटकुळच्या एका सामान्य शेतकऱ्याचं ६० दिवसांचं धरणं अजित पवारांना खुपलं
खरं तर धरणं नाहीतर त्या शेतकऱ्याने उपस्थित केलेला प्रश्न त्यांना खुपला होताप्रभाकर 
देशमुखांचा उद्धार करत अजित पवार बरसलेएका छोट्या गावातविशेष महत्त्वाच्या 
नसलेल्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याची दखल कोण घेणारअसं त्यांना वाटलं असेल
पण सामान्य माणसाला डिवचलं की काय होतंत्याची तिथून पुढे घडलेली हकिगत 
आता सर्वांच्या समोर आहेसाध्याच माणसांचा एल्गार सत्ताधाऱ्यांच्या सिंहासनाखाली 
सुरुंग पेरत असतो !

कपिल पाटील, अध्यक्ष, लोक भारती. 
  पूर्व प्रसिद्धी महाराष्ट्र टाइम्स (Apr 16, 2013)