Monday 15 June 2020

कोकणातील वादळग्रस्त शाळा, कॉलेजना मदत जाहीर करा


प्रति,
मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

मा. ना. श्री. अजित दादा पवार
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

मा. ना. श्री. उदय सामंत
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य
तथा 
पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा

मा. ना. श्रीमती वर्षाताई गायकवाड
शालेय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य

महोदय / महोदया,
निसर्ग वादळाने कोकणामध्ये शेतकऱ्यांची आणि बागायतदारांची अपरिमित हानी केली आहे. लोकांच्या घरांचंही प्रचंड नुकसान झालं आहे. सरकारने त्यांना मदतही जाहीर केली आहे. मात्र रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीच्या परिसरात असलेल्या शेकडो शाळा आणि काही महाविद्यालये आपदग्रस्त झाली आहेत. ती अजून बेदखल आहेत. 





बहुतेकांची छपरं उडून गेली आहेत. इमारतींची पडझड झाली आहे. काही शाळांची तर फार दैना झाली आहे. महाविद्यालयांच्या प्रयोगशाळा, कॉम्प्युटर लॅब, वर्गखोल्या यांची मोठी हानी झाली आहे. प्रत्येक शिक्षण संस्थेचे किमान 15 लाख ते 2 कोटींचे नुकसान झाले आहे. या शिक्षण संस्थांना ताबडतोब मदत केली नाही, तर अनेक ठिकाणी नजीकच्या काळात शिक्षण सुरू करणे कठीण जाईल. पावसाळ्यात इमारतींची आणखी हानी होईल.

कोकणातील या गरीब शिक्षण संस्थाना मदतीचे अन्य कोणतेही स्रोत उपलब्ध नाहीत. 





या संस्थांच्या नुकसानीचा पंचनामा अद्यापही झालेला नाही. या संस्थांची झालेली हानी शासन दरबारी बेदखल आहे. तरी कृपया आपण तातडीने लक्ष घालून कोकणातील शिक्षण संस्थांच्या पुनर्रउभारणीसाठी किमान 25 कोटींचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, ही विनंती.

दि. 13 व 14 जून रोजी मी स्वतः रायगड आणि रत्नागिरी मधील अशा आपदग्रस्त शाळा, महाविद्यालयांना भेट दिली. नुकसानीची पाहणी केली. वरील बाबी आणि शाळांच्या नुकसानीची माहिती मी मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना खासदार विनायक राऊत, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख, काँग्रेस आमदार भाई जगताप यांना दापोली येथे झालेल्या भेटीत निदर्शनास आणून दिली आहे. 

बुक्टोच्या नेत्या ताप्ती मुखोपाध्याय आणि मधु परांजपे यांनी कोकणातील वादळग्रस्त महाविद्यालयांबद्दल माझ्याशी सर्वप्रथम चर्चा केली होती. मदत मिळवून देण्याबाबत पाठपुरावा करण्याची विनंती केली होती. त्यांच्याच सूचनेनुसार मी दौरा करून वसुस्थिती जाणून घेतली. याबाबत बुक्टोने तयार केलेल्या रिपोर्टबद्दल मी यापूर्वीच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्यासोबत चर्चा केली आहे.







या दौऱ्यात शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे,  शिक्षक भारती रत्नागिरी जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, लोकनेते गोपीनाथ मुंडे कॉलेज मंडणगडचे देवरे सर, रामराजे कॉलेज दापोलीचे संदीप राजपुरे सर, वराडकर बेलोसे कॉलेजचे संदीप निंबाळकर सर, दापोली अर्बन बँकेचे कॉलेज दापोलीचे जगदाळे सर, साबळे कॉलेज माणगावचे टी. एम. जाधव सर, प्राचार्या श्रीमती कुलकर्णी, प्रा. साळुंखे, प्रा. जगदीश ठाकूर, शिक्षक भारती रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष जाधव, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब रूपन्नावर, जिल्हा कार्यवाह निलेश कुंभार, माध्यमिक पतपेढीचे चेअरमन अमित कदम, राज्य प्रतिनिधी पवनकुमार माने, दापोली तालुका अध्यक्ष मुबीन बामणे, खेड तालुका अध्यक्ष संदीप पाटील, बाजीराव कोराने, राजेश माळी, सावर्डेकर सर कांबळे सर, मुख्याध्यापक शशिशेखर शिंदे, मुख्याध्यापक भानुदास नागणे, मंडणगडचे सत्तार इम्तियाज, रियाज म्हसळे, नांदगावकर, 
प्राथमिक शिक्षक भारती रायगडचे विनोद कडव, सतिश हुले, विजय शिंदे, संजय पोईलकर, गणेश ढेपे, मोतीवाले परांजपे हायस्कुल चिपळूणचे सावर्डेकर सर, कांबळे सर, नायशीचे (चिपळूण) राजेश माळी सर यांनी मदत केली. 

काही संस्थांची निवेदनं आणि दौऱ्यातील प्रत्यक्ष पाहणीच्या आधारे धनाजी पाटील यांनी एक रिपोर्ट तयार केला आहे. तो सोबत जोडला आहे.



कृपया तातडीने मदत जाहीर करावी, ही विनंती.
धन्यवाद!

आपला स्नेहांकित,

कपिल पाटील, विपस

No comments:

Post a Comment